Saturday, November 29, 2008

मुंबई

खरे पाहता कृत्तिका ही जागा मी आज ज्या विषयावर बोलणार आहे त्यासाठी नाही आहे. पण माझ्या मनातील राग आणि भावना व्यक्त करण्यासाठी आज मी थोडी स्वार्थी होणार आहे. विषय जो आज प्रत्येक माणसाच्या मनात जागा आहे, विषय आज ज्यावर कित्येक ब्लॉग आपली मते मांडत आहेत. मुंबई आणि तिथे गेल्या चार दिवसात जे काही घडले. मला त्या गोष्टींचा उहापोह इथे करायचा नाही आहे, नाही मी सुरक्षा व्यवस्था ह्यासारख्या विषयावर बोलणार आहे. साहजिकच मी का लिहितेय क्या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल.
मी एक मुंबईकर आहे. परंतु माझ्या नुकत्याच पार पडलेल्या मुंबई भेटीपर्यंत मी खरी मुंबईकर नव्हते असेच म्हणावे लागेल. गेल्या काही महिन्यांपासून मी झीरो पॉइण्ट बॉम्बे हे पुस्तक वाचतेय.हे पुस्तक एन्ग्रजि भाषेत आहे. २१ लघुनिबंधांच्या ह्या लहानश्या संग्रहात मुंबईविषयी फार रमणीय माहिती आहे. एकीकडे हे पुस्तक वाचताना घडलेली मुंबई भेट मला मुंबई वेगळ्याच चश्‍म्यातून दाखवून गेली. एशियाटीक सोसायटीचे भव्य खांब पाहाताना मला माहिती होते की ते ब्रिटन मधून तयार करून आणले आहेत. कोलब्यामधील प्रत्येक वास्तू माझ्यासमोर युरोपियन आणि भारतीय वास्तुकलेचा एक नमूना समोर ठेवत होती. लेओपॉल्ड केफे मला शांतारामची आठवण देऊन गेला. आणि माझ्या मनात एकाच विषार येत होता, ह्या गोष्टी जपल्या गेल्या पाहिजेत. ही जागा अजूनही सुंदर बनवली गेली पाहिजे. कदाचित पहिल्यांदाच मला प्रकर्षाने जाणवत होते की ज्या ठिकाणी माझा उद्गम झाला आहे ती जागा स्वातंत्र्य युद्ध सोडून अजुन कितीतरी गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. आणि मुंबईत राहणार्‍या काहीच लोकणा ह्याबद्दल माहिती आहे.
लेओपॉल्ड केफे, सी. एस. टी. स्टेशन, किंवा ताज ह्यांसारख्या ठिकणांवर झालेले हल्ले हे केवळ मुंबईवरच नव्हते तर ते त्या प्रत्येक मुंबईकरवर होते ज्याने मुंबईवर मनापासून प्रेम केला आहे. ज्याने पाव भाजी आणि वडा पाव सोबत आयुष्या घालवला आहे, ज्याने लेओपॉल्ड मधे बसून बियर प्यायली आहे आणि ज्याने एसियाटीक सोसायटीच्या आवारात रात्री घालवल्या आहेत, ज्याने मुंबईचा इतिहास आणि मुंबईचे भविष्य एकत्र पहिले आहे, त्या प्रत्येकाला ह्या घटनेने हादरवले आहे. प्रशासन आणि सुरक्षा व्यवस्थेने काय केले पाहिजे यापेक्षा आज अधिक महत्वाचा प्रश्न आहे की आपण काय केले पाहिजे. आणि कमीत कमी आपण ह्या शहराला जपले पाहिजे. प्रेम करणे म्हणजे आय लव मुंबई असे म्हणणे किवा मी मुंबईचा विचार करतो असा असतो की हे माझे शहर आहे आणि ह्याच्या सुरक्षेसाठी मी सर्व प्रयत्न करेन हा दृष्टिकोन असतो?
माझ्या मते अगदी सर्वसामान्यांच्या मनात हा विचार जागा होत नाही तोपर्यंत आपला हलगर्जीपणा थांबणार नाही आणि तोपर्यंत आज ज्यानी आपले जीव घालवले त्यांची आहुती सार्थ होणार नाही.

Monday, August 18, 2008

डार्क मैटर

तुम्ही आणि मी ज्या अणू-रेणू पासून बनले आहोत ते ह्या विश्वाचा केवळ पाच टक्के भाग आहे असा जर तुम्हाला सांगितले तर ते खरा वाटेल? पण हे खरे आहे. मनुष्य आणि ही संपूर्ण जीवसृष्टी ह्या विश्वाचा अत्यंत छोटा भाग आहेत. ह्या विश्वाचा जवळपास वीस ते पंचवीस टक्के भाग अदृश्य घटकाने व्यापला आहे ज्याला आपण डार्क मॅटर म्हणतो आणि उर्वरित सत्तर टक्के अदृश्य उर्जा आहे जीला खगोलशतराज्ञ डार्क एनर्जी ह्या नावाने ओळखतात. आपले विश्व असे आहे ह्यावर आज खगोलशास्त्रज्ञांचे एकमत आहे. पण हे ९५ टक्के विश्व जे आपल्याला दिसत नाही ते कसले बनले आहे आणि काय आहे हा प्रश्ना साहजिकच आपल्या मनात येतो. डार्क एनर्जी हे आज खगोलशास्त्रातील एक आव्हान आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. आपल्याला आजवर डार्क एनर्जी बद्दल फार थोडे माहिती आहे. डार्क मॅटर ह्या विषयावर त्या मानाने आपण जरा भाग्यवान आहोत. ह्याचे महत्वाचे कारण म्हणजे डार्क मॅटर हे गुरुत्वकर्शणाच्या माध्यमाने इतर घटकांशी माध्यमातून आपले अस्तित्व दाखवून देते. इतक्या मोठ्या प्रमणावर उपस्थित असल्याने ते इतर घटकांना आकर्षित करते. डार्क मॅटर ह्याबद्दल सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे प्रकाशाच्या काणांबरोबर किंवा प्रकाशाशी ह्याची प्रकशासोबत प्रतिक्रिया होत नाही. ह्यामुळे आपल्याला ते दिसताही नाही. परंतु विश्वाच्या मोठ्या प्रमाणावरील रचनेच्या अभ्यासातून हे निष्पन्न झाले आहे की हे उर्जा नसून काणांचे बनले आहे, म्हणजेच हे वस्तुमान ( मॅटर) आहे.
येथून पुढील काही लेखांमधे मी ह्या अदृश्य घटकावर प्रकाश टाकायचा प्रयत्न करेन.