यूरोपचे पहिले चांद्रयान काल चंद्रावर आदळविण्यात आले. या मोहिमेची महत्त्वाची बाजू होती ह्या यानासाठी वापरण्यात आलेले इंजिन. आयनांचा वापर करून यानाला चंद्राकडे नेणे ही एक कठीण गोष्ट ह्या मोहिमेने करून दाखविली. या स्वस्त इंधनामुळे यूरोपियन स्पेस एजन्सीला नेहमी पेक्षा कमी खर्चात ही कामगिरी पार पाडता आली.
आयनांचा वापर करून फ़ार कमी त्वरण प्राप्त होते परंतु अवकाशात असलेल्या निर्वातामुळे हळूहळू यानाचा वेग वाढत जातो व एका जहाजाप्रमाणे अवकाशात तरंगत यान आपल्या निर्धारीत जागी पोहचवता येते. धडकेमुळे चंद्रावर जी धूळ उडाली तिचे विश्लेषण करण्याचा देखिल प्रयत्न केला गेला.
भारतीय चांद्रयान मोहिम २००७-०८ या मोहिमेत तयार करण्यात आलेली काही उपकरणे वापरेल.
दरम्यान नासाने मानवाला चंद्रावर पुन्हा नेण्यासाठी यान बनविण्यासाठीचा करार लॉकहीड मार्टिन या कंपनीबरोबर केला आहे. अपोलो यानांनतरची ही पहिली मानवाला चंद्रावर नेणारी मोहिम असेल.
अवकाशसंशोधन ही फ़ार खर्चिक गोष्ट आहे. या मोहिमांसाठी खर्च करण्याऐवजी पृथ्विवरिल प्रश्न सोडविणे जास्त महत्त्वाचे नाही का हा प्रश्न सहाजिकच मनात येतो. खरतर आज सर्व राष्ट्रांची सुरक्षेसाठी किती खर्च होतो याचा हिशोब केला तर त्या मानाने अवकाशसंशोधन कमी खर्चिक ठरते. थोडक्यात आपआपल्यात भांडण्या ऐवजी आपले ज्ञान वाढविण्यासाठी जर खर्च केला गेला तर ते जास्त उपयोगाचे ठरू शकेल.
Monday, September 04, 2006
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
Marathi madhun lihilya baddal abhar
Post a Comment