
संपूर्ण सूर्यमालेत असा एकमेव ग्रह जेथे सजीवसृष्टीचे अस्तित्व आहे. वातावरणातिल वायूंचा योग्य समतोल, सूर्यापासूनचे योग्य अंतर व त्यामुळे योग्य तापमान, ऑक्सीजन तयार करणारी झाडे आणि वापरून झाडांसाठी त्यांचा प्राणवायू (कार्बनडायोक्साईड) प्राणी यांच्यातिल एक अलिखित करार... हे सर्व येथे जिवनास कारणीभूत ठरते. सूर्याच्या दृष्टीने एक छोटा कण, पण आपल्यासाठी एक घर... विश्वात स्वर्ग कोठे आहे असे कोणी विचारले तर नक्कीच मी पृथ्वीकडे बोट दाखवेन...
पृथ्वीवर जिवन असणे हा निसर्गाचा एक नाजूक समतोल आहे. तो ढळू न देणे हे पृथ्विवरिल स्वतःला सर्वात बुद्धिमान सजीव म्हणवणाऱ्या मानवजातीचे कर्तव्य आहे. झाडांची लागवड व निगा, जंगलसंरक्षण व जतन हे आपले कर्तव्य आहे. आजचा विचार व स्वार्थ सोडून आपल्या पुढिल पिढ्यांचा जर विचार केला तर ही कामे सुरू करणे गरजेचे आहे. सर्वत्र राष्ट्रांनी जंगलनिर्मीतीचा संकल्प हाती घेणे गरजेचे आहे. गरीबांसाठी रोजगार निर्माण करून लोकसंख्येच्या विस्फ़ोटाला आळा घालणे गरजेचे आहे.
युद्धांबद्दल ऐकून मन विषण्ण होते. पृथ्वीवर जनजिवन तयार होण्यासाठी शेकडो वर्षे लागली. आणि ते आपण आपल्या स्वार्थासाठी, जमिनीच्या एका छोट्या तुकड्यासाठी उद्ध्वस्थ करायचे का? आयुष्य भरात पोहोचता येईल एवढ्या अवकाशामध्ये पृथ्वी सोडून एकही ग्रह वास्तव्यासाठी पोषक नाही. ह्या गोष्टीचे गांभिर्य आपण केव्हा लक्षात घेणार?
मला समजते की बोलणे जितके सोपे असते तेवढे करणे तितकेच कठिण, पण प्रयत्न नक्कीच करता येऊ शकतो. प्रत्येक गोष्ट आपण एकट्याने केल्याने काय होणार असा विचार करत टाळली तर पृथ्वीवरून जिवन नष्ट होण्यास वेळ लागणार नाही.
छायाचित्र हक्क: Apollo 17 Crew, NASA
No comments:
Post a Comment